भाग्यांक २
या अंकावर चंद्र या ग्रहाचा अंमल आहे. चंद्र कोणाला आवडत नाही? तसंच२ हा भाग्यांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ही म्हणता येईल. चंद्राविषयी आपण काय म्हणू शकतो, तर तो शितल आहे... सुखद आहे.... आंनददायी आहे वगैरे. तसंच या भाग्यांकाच्या लोकांबाबत (ज्यांची जन्मतारीख२,११,२० किंवा २९ आहे) म्हणता येईल. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे. आपल्या मनात अनेक विचारांचे हिंदोळे असतात तसंच चंद्र ज्याच्या दर दिवशी काही कला कमी अथवा अधिक होत असतात. अमावस्येला तो पूर्ण लुप्त असतो तर पौर्णिमेला अगदी पूर्ण प्रकाशित असतो. थोडक्यात आपल्या मनाचे तरंग दाखवणारा असा ग्रह म्हणजे चंद्र अगदी बरोब्बर वाटतो. याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून समुद्राला भरती- ओहोटी येते, कारण चंद्र हा जलतत्व दर्शवतो. याचेच परिणाम आपल्याला मानसिक दृष्ट्या कमकुवत लोकांवर दिसतो. याचं शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर हेच की आपल्या शरीरात ७०% पाणी आहे. असो विषयांतर होण्यापूर्वीच २ या आपल्या आजच्या अंकाकडे वळू या. तर एकूणच या अंकाच्या व्यक्ती जास्त भावनिक, दुसऱ्याचा जास्त विचार करणाऱ्या अशा असतात. थोड्या चंचल, कविमनाच्या असल्याने व्यावहारिक गोष्टीत फारसे रमत नाहीत. दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवून काही वेळा नुकसान करून घेतात तर काही वेळा आलेली संधी यांच्या लक्षातच येत नाही. ज्यांची जन्मतारीख २ किंवा २० आहे त्या लोकांच्या बाबतीत या गोष्टी प्रकर्षाने दिसून येतील. ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांची वेगळीच गंमत कारण मागच्या पोस्टमध्ये पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल की १ हा अंक रविचा आहे. रवि अधिकारी, अभिमानी वृत्ती दर्शवतो आणि हे लोक (२ अंकाचे) तर पूर्णपणे मनाच्या अंमलाखाली. यामुळेच ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांच्या बाबतीत हे ठामपणे सांगता येईल की हे अतिशय परोपकारी वृत्तीचे असतात. यांना कोणी मदत मागितली तर त्याला नाही म्हणणे या लोकांना जमत नाही, त्यांना कमीपणाचे वाटते. तसंच कोणाची मदत घेणे देखील यांच्या तत्वात बसत नाही. मिंधेपणा यांच्यात कधीच दिसणार नाही. २९ जन्मतारीख असलेले लोक म्हणजे चंद्र आणि मंगळ यांच्या माध्यमातून स्वतःचा स्वभाव दाखवतात. हे भावूक असतात आणि त्यांच्या भावना बऱ्याचदा चिडून, संतापून व्यक्त होतात. त्यामुळे या लोकांवर 'तापट' असा शिक्का लागतो पण वास्तविक ते खूप भावनिक असतात आणि जीव तोडून दुसऱ्याचा विचार करतात, फक्त समोरच्याविषयी वाटणारी काळजी, प्रेम व्यक्त करण्याची नेटकी पद्धत यांनी शिकायला हवी.
तर असे हे भाग्यांक २ चे अंतरंग. यांच्या गुणदोषावर मात करायला त्यांचा भाग्यांक तक्ता त्यांना नक्की मदत करू शकतो. त्यामुळे ते कदाचित थोडे सजग राहतील, थोडे संयमी होतील किंवा अधिक आत्मविश्वासू होतील.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्दल नक्की comment करा. तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही लिहू शकता. भाग्यांक तक्ता आणि अंकशास्त्रविषयी आणखी जाणून घेण्यासाठी login करा http://pradnyaastro.blogspot.com
या अंकावर चंद्र या ग्रहाचा अंमल आहे. चंद्र कोणाला आवडत नाही? तसंच२ हा भाग्यांक असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत ही म्हणता येईल. चंद्राविषयी आपण काय म्हणू शकतो, तर तो शितल आहे... सुखद आहे.... आंनददायी आहे वगैरे. तसंच या भाग्यांकाच्या लोकांबाबत (ज्यांची जन्मतारीख२,११,२० किंवा २९ आहे) म्हणता येईल. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र हा ग्रह मनाचा कारक आहे. आपल्या मनात अनेक विचारांचे हिंदोळे असतात तसंच चंद्र ज्याच्या दर दिवशी काही कला कमी अथवा अधिक होत असतात. अमावस्येला तो पूर्ण लुप्त असतो तर पौर्णिमेला अगदी पूर्ण प्रकाशित असतो. थोडक्यात आपल्या मनाचे तरंग दाखवणारा असा ग्रह म्हणजे चंद्र अगदी बरोब्बर वाटतो. याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून समुद्राला भरती- ओहोटी येते, कारण चंद्र हा जलतत्व दर्शवतो. याचेच परिणाम आपल्याला मानसिक दृष्ट्या कमकुवत लोकांवर दिसतो. याचं शास्त्रीय कारण सांगायचं झालं तर हेच की आपल्या शरीरात ७०% पाणी आहे. असो विषयांतर होण्यापूर्वीच २ या आपल्या आजच्या अंकाकडे वळू या. तर एकूणच या अंकाच्या व्यक्ती जास्त भावनिक, दुसऱ्याचा जास्त विचार करणाऱ्या अशा असतात. थोड्या चंचल, कविमनाच्या असल्याने व्यावहारिक गोष्टीत फारसे रमत नाहीत. दुसऱ्यावर पटकन विश्वास ठेवून काही वेळा नुकसान करून घेतात तर काही वेळा आलेली संधी यांच्या लक्षातच येत नाही. ज्यांची जन्मतारीख २ किंवा २० आहे त्या लोकांच्या बाबतीत या गोष्टी प्रकर्षाने दिसून येतील. ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांची वेगळीच गंमत कारण मागच्या पोस्टमध्ये पाहिल्याचे तुम्हाला आठवत असेल की १ हा अंक रविचा आहे. रवि अधिकारी, अभिमानी वृत्ती दर्शवतो आणि हे लोक (२ अंकाचे) तर पूर्णपणे मनाच्या अंमलाखाली. यामुळेच ज्यांची जन्मतारीख ११ आहे त्या लोकांच्या बाबतीत हे ठामपणे सांगता येईल की हे अतिशय परोपकारी वृत्तीचे असतात. यांना कोणी मदत मागितली तर त्याला नाही म्हणणे या लोकांना जमत नाही, त्यांना कमीपणाचे वाटते. तसंच कोणाची मदत घेणे देखील यांच्या तत्वात बसत नाही. मिंधेपणा यांच्यात कधीच दिसणार नाही. २९ जन्मतारीख असलेले लोक म्हणजे चंद्र आणि मंगळ यांच्या माध्यमातून स्वतःचा स्वभाव दाखवतात. हे भावूक असतात आणि त्यांच्या भावना बऱ्याचदा चिडून, संतापून व्यक्त होतात. त्यामुळे या लोकांवर 'तापट' असा शिक्का लागतो पण वास्तविक ते खूप भावनिक असतात आणि जीव तोडून दुसऱ्याचा विचार करतात, फक्त समोरच्याविषयी वाटणारी काळजी, प्रेम व्यक्त करण्याची नेटकी पद्धत यांनी शिकायला हवी.
तर असे हे भाग्यांक २ चे अंतरंग. यांच्या गुणदोषावर मात करायला त्यांचा भाग्यांक तक्ता त्यांना नक्की मदत करू शकतो. त्यामुळे ते कदाचित थोडे सजग राहतील, थोडे संयमी होतील किंवा अधिक आत्मविश्वासू होतील.
तुम्हाला हा लेख कसा वाटला, याबद्दल नक्की comment करा. तुमचे प्रश्न सुद्धा तुम्ही लिहू शकता. भाग्यांक तक्ता आणि अंकशास्त्रविषयी आणखी जाणून घेण्यासाठी login करा http://pradnyaastro.blogspot.com

3 comments:
नमस्कार
माझी जन्म तारीख 11 आहे . 11 ह्या अंकाविषयी आपण जे लिहिले आहे ते मला लागू पडते आहे. हे खरे आहे.
श्रीप्रसाद कुलकर्णी
Thank you for your feedback Sir!
छान माहिती ताई
Post a Comment